येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या स्वबळावर लढविणार असल्याचे पाठिमागे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी घोषित केले होते. आणि भाजप सोडून बाकीच्या सर्व पक्षांशी युती चे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये करण्यात आले. याचेच अनुकरण करत आज करमाळ्या मध्ये येणाऱ्या ZP आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका या स्वबळावर लढवू आणि कोणताही पक्ष किंवा गट युती करण्यास एछुक असेल तर काही विचार विनिमय करून त्यांच्याशी युती करु ते पण भाजप सोडून अशी घोषणा करमाळ्याती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ यांच्या कडून असे सांगण्यात आले आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या मते वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोण्या एका जातिचा नाही तर तो सर्व जाती धर्मातील शोधीत, पिडीत व वंचित लोकांचा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद पेटला आहे याच्या कडे लक्ष न देता करमाळा तालुक्यांमध्ये सर्वसाधारण जागे मध्ये योग्य उमेदवार उभा करणार आहोत असे ही सांगण्यात आले.
या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे विशाल लोंढे ( शहर अध्यक्ष) , प्रविण मखरे , अतुल गायकवाड, नामदेव पालवे , जिल्हासंघटक देविदास भोसले , तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, आदिवासी समाजातील पप्पू काळे, लखन पवार, धनगर समाजातील नेते आबासाहेब भिसे, कामोणे नवनाथ भालेरा आदी मान्यवर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
























